जालना सहल प्रकरणातील पत्रकाराचा राजीनामा घेतला !

भाजप प्रदेशाध्यक्षाने प्रायोजित केलेल्या जालना येथील ५ पत्रकारांच्या विमान सहलीचा बेरक्याने पर्दाफाश केल्यानंतर या सर्व पत्रकारांच्या दैनिकाच्या व्यवस्थापनाने चौकशा सुरू केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी माफीनाम्यावर दिलासा मिळालेल्या सर्वाधिक खपाच्या दैनिकाचे जालना येथील पत्रकार संजय देशमुख यांचा आज एच आर विभागाने औरंगाबादला बोलावून राजीनामा घेतला आहे. तर 'मानबिंदु'ने सहलीला गेलेल्या पत्रकाराच्या अधिकारात मोठी कपात केली आहे. त्याच्यावर 'लक्ष' ठेवण्यासाठी औरंगाबाद येथून सोमनाथ खताळ यांना पाठवण्यात आले आहे. त्यांनी जालना कार्यालयात काम सुरू केली असून त्यांच्या २ बायलाईन बातम्याही आल्या आहेत.
औरंगाबादच्या 'पुण्य'च्या मोठया सेठजीनी अद्याप सहल प्रकरणात लक्ष घातलेले नाही. सहलीहून येवून पुन्हा गायब झालेला त्यांचा पत्रकार कधी रुजू होतोय, याची सेठजी वाट पाहत आहेत. विमान सहलीदरम्यान कार्यालयात गैरहजर असतानादेखील 'पुण्य'च्या जिल्हा प्रतिनिधीने हजेरी पुस्तकावर सह्या केल्याचे समजते. त्यामुळे मोठे सेठजी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भोपाळसेठच्या 'भव्य मराठी' च्या जालन्याच्या प्रतिनिधीवर औरंगाबादच्या ब्यूरो चीफ मुळ हुद्दा असलेल्या सॅटेलाईट एडिटरचा वरदहस्त असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे. 'सॅटेलाईट' ला 'राज्य'चा आशीर्वाद आहे.
'मानबिंदू'ने भोकरदनला नवीन वार्ताहाराचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे सहलीला गेलेल्या भोकरदन वार्ताहाराची हकालपट्टी नक्की मानल्या जाते.