ऐसी दिवानगी,देखी नही कहीं...

औरंगाबाद - महाराष्ट्राच्या मानबिंदूचे प्रादेशिक वृत्त विभाग प्रमुख अर्थात दिवाणजीमुळे संपादकभाऊ चांगलेच अडचणीत आले आहेत.हे दिवाणजी कामाऐवजी संपादक भाऊंची चापलूसी अर्थात तळवे चाटून चाड्याचुगल्या करत असल्याने अनेक कर्मचारी भाऊंच्या विरोधात गेले आहेत,त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मानबिंदूच्या सर्व घडामोडी,हालचाली आणि इतर माहिती आपले जुने स्नेही रंगिला औरंगाबादीला देत असल्यामुळे शेठजीही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
हे दिवाणजी पुर्वी मुंबईला असताना,रंगिला औरंगाबादीचे खास दिवाण होते.तेथेही असेच तळवे चाटत होते.आता सोलापूर व्हाया जळगावहून आलेल्या संपादक भाऊंचे तळवे चाटण्यात मश्गुल आहेत.काम कमी आणि चापलूसी जास्त करण्यात हे दिवाणजी कुप्रसिध्द आहेत.ते कर्मचा-यांच्या चाड्या चुगल्या करत असल्याने अनेकजण भाऊच्या विरोधात गेले आहेत.त्यांनी केलेल्या कारनाम्याच्या काही गोष्टी शेठजीच्या कानावर गेल्या आहेत.त्यामुळे संपादकभाऊ चांगलेच अडचणीत आले आहेत.मध्यंतरी झालेल्या हेल्मेट प्रकरणामुळे संपादकभाऊ चांगलेच अडचणीत सापडले होते.आता दिवाणजीमुळे आणखी अडचणीत आले आहेत.
हे दिवाणजी महाराष्ट्राच्या मानबिंदूमधील सर्व घडामोडी आणि इत्थंभूत माहिती पद्मश्रीच्या पेपरमध्ये खिचपत पडलेल्या आपल्या जुन्या वरिष्ठांना अर्थात रंगिला औरंगाबादीला कळवत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये ठेवलेल्या दिवाणाच्या भरोश्यावर रंगिला औरंगाबादी सर्व घडामोडी,माहिती पद्मश्रींना रंगवून सांगत असल्याने पद्श्री जाम खूश आहेत.रंगिला औरंगाबादीमुळे मुंबईमधील अनेकजण सोडून गेले,नविन माणसे यायला तयार नाहीत,परंतु पद्मश्री रंगिला औरंगाबादीला काढायला तयार नाहीत.त्याचे ऐकमेव कारण आहे,दिवाणजीमार्फत रंगिला औरंगाबादीला कळणा-या महाराष्ट्राच्या मानबिंदूमधील घडामोडी !
आता बोला ? कोण, कसं करत ? कोणाला दिवाना ? 
त्यामुळेच म्हणू वाटत आहे,ऐसी दिवानगी,देखी नहीं कहीं !