सकाळच्या बदनामीमागे कोणाचा 'हात' ?

सकाळला बदनाम करण्याचे काम सध्या प्रतिस्पर्धी दैनिकाकडून सुरू आहे.या दैनिकाच्या मालकाने सकाळला बदनाम करण्यासाठी एक टीमच तयार केली असून, सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहे.या पोस्टमध्ये पुणे बस डे चा हिशोब तसेच अन्य उपक्रमाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
त्याला किरण कोल्हे यांनी उत्तर दिले आहे.ते असे...
.................................................................




सकाळला धन्यवाद

प्रश्न पाण्याचा असो नाहीतर पुण्यातल्या बसचा. सरकारनं करायला हवं ते काम सकाळ समाजासाठी करतो आहे आणि तेही लोकांना बरोबर घेऊन यासाठी सकाळविषयी कृतज्ञताच व्यक्त करायला हवी.
मी बस डे चा साक्षीदार आहे आणि पुढच्या घटनाक्रमाचाही...
सकाळने नुसता एक दिवस उपक्रम केला नाही दर महिन्याला आढावा दिला... अनेक मुद्दे सुटायला लागले काही अडले ते झारीतल्या शुक्राचार्यांमुळे... त्यांना सरळ करायचे तर समाजानेच पुढे व्हायला हवे... बस डे चा जमाखर्च पारदर्शपणे मांडला तो सकाळनेच...मला आठवते ती तारिख...
माळिण गावावर आपत्ती आली तेव्हा पहिल्यांदा मदतीचा हात पुढे केला सकाळनेच ...
रिलीफ फंडातून कित्येक कामे उभी राहिली आहेत...
तनिष्का नावाची एक चळवळच राज्यात उभी राहिली ती सकाळच्या परंपरेला साजेशीच आहे. तनिष्का सदस्यांनी स्वतःहून फी भरुन सहभाग घेतला त्यापलिकडं यासाठी कुणाकडून निधी गोळा केल्याचं एेकिवात नाही आता कंड्याच पिकवणारयांना किती महत्व द्यायचं.
सर्व जल अभियान तर एक वर्तमानपत्र काय करु शकते याचा आदर्श नमूनाच आहे. राज्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी सकाळने आधी पदरचे २० कोटी रुपये दिले नंतर लोकांकडे मदत मागितली आणि तिचा उपयोग पाण्यासाठीच होईल याची खात्रीच आहे. कारण तसा माझा अनुभव आहे...
समाजाच्या भल्यासाठी जागा, वेळ, पैसा, सारी साधनं देणारया सकाळला साथच द्यायाला हवी. खरंतर आपल्या भविष्याचा विचार करतानाही वर्तमानातल्या सगळ्या घडामोडी सकाळ देतोच...त्यातलं तर काहीच चुकत नाही...
म्हणूनच सकाळ वाचयचा मह्णजे समाज बदलायचा, आयुष्य घडवायचं पाहा, पटलं तर तुमच्या ग्रुपवर शेअर कराच...
किरण कोल्हे