शनिवार 18 मे 2013
शुक्रवार 17 मे 2013
आर्थिक वर्ष 2013 भास्कर समूहासाठी फायद्याचे; 'डीबी कॉर्प'चा जाहिरात महसूल वाढला
11-52 PM
बेरक्या उर्फ नारद
गेल्या
आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा ३ मार्च रोजी संपलेले आर्थिक वर्ष 2013
भास्कर समूहासाठी फायद्याचे ठरले आहे. 'डीबी कॉर्प'चा जाहिरात महसूल 9.5
वाढला. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने जाहीरातीतून 1475 कोटी रुपये कमाविले
होते. आर्थिक वर्ष 2013 मधील जाहिरातीची कमाई आहे 1613 कोटी रुपये! 'डीबी
कॉर्प'ची वितरणातील कमाई 62 कोटीवरून 73 कोटीवर पोहोचला आहे. त्यात 'दिव्य
मराठी'चा मोठा वाटा आहे. वर्षाच्या चौथ्या तिमाहीत तर डीबी कॉर्प कंपनीची
कामगिरी फारच जोरदार झाली आहे. केंद्र व राज्य सरकारचे सर्व कर चुकवून
नफ्यात 22 टक्के वाढ झाली. नफा या तिमाहीत 45 कोटीवरून 55 कोटीवर
पोहोचला.
'डीबी कॉर्प'चे मैनेजिंग डायरेक्टर, सुधीर अग्रवाल
कंपनीच्या चौथ्या तिमाहीतील या कामगिरीविषयी काय म्हणतात, ते त्यांच्याच शब्दात (हिंदीत) : -
“इस
तिमाही में हमारा फोकस इनोवेशन और अपने प्रोडक्ट को और अच्छा करना रहा है।
हमने टॉपलाइन में अच्छा विकास दर्ज किया है और कुल मिलाकर हमारा प्रदर्शन
शानदार रहा है। हम लगातार अपनी आंतरिक क्षमता, प्रोडक्ट इनोवेशन और मार्केट
डेवलपमेंट्स पर नजर रखेंगे।”
“आगे का रास्ता विकास की ओर जाता
है और हमें विश्वास है कि सरकार सुधार के दूसरे चरण की प्रक्रिया को तेजी
से लागू करेगी, जिससे इंडस्ट्री को मदद मिलेगा। हम हर तरह से कर्मचारियों,
तकनीक, इनोवेशन, मार्केटिंग और मूलभूत सुविधाओं को बढ़ाने के लिए हरसंभव
प्रयास करेंगे।”
नोट: 'बेरक्या'में हम आपकी राय और सुझावों की कद्र करते हैं। आप अपनी राय,सुझाव और ख़बरें हमें berkya2011@gmail.com पर भेज सकते हैं।
'दिव्य मराठी'तील प्रशांत दीक्षित यांच्या नियुक्तीमुळे समर खडस गँगची हवा टाइट
11-50 PM
बेरक्या उर्फ नारद
दैनिक
'सकाळ'च्या 'युवा सकाळ'मुळे महाराष्ट्रभर चर्चेत आलेले प्रशांत दीक्षित
'दिव्य मराठी'त रुजू झाल्यामुळे मुंबई कार्यालयाचा ताबा घेतलेल्या समर खडस
गँगची हवा टाइट झाली आहे. खरेतर 'दिव्य मराठी'च्या मुंबई ब्युरोने
अजूनपर्यंत फारशी चमकदार कारवाई केलेली नाही. मुंबईत वृत्तपत्र येत नाही
म्हणून कामात मजा नाही, असे हे सारे ज्याला-त्याला सांगतात. मात्र, मुळातच
कुमार केतकर 'लोकसत्ता'बाहेर जाताच त्यांची सर्व गँगही पाठोपाठ 'दिव्य
मराठी'त आली होती. समर खडस हा या गँगचा म्होरक्या! खरेतर यातील अनेकजण
सध्याच्या पत्रकारितेत आऊटडेटेड आहेत. चंद्रकांत शिंदे आणि श्रुती गणपत्ये
यांच्यासारख्या नवख्यांवर राजकीय रिपोर्टींगचा भार असल्यावर वेगळे काही
मिळण्याची अपेक्षा नाहीच. समर खडस वाहिन्यांवरील रटाळ चर्चेत रात्री नेहमी
दिसतात; पण 'दिव्य मराठी'मध्ये काही कधी दिसले नाहीत. स्वत: केतकर हे
कॉंग्रेस आणि सोनियांच्या प्रेमात इतके आकंठ बुडालेले आहेत की
महराष्ट्रातील सर्वात हुशार, अभ्यासू संपादक लाभला तरीही गेल्या दोन वर्षात
'दिव्य मराठी'ची कधी राजधानीत चर्चा झाली नाही. केतकरांच्या एकांगी अग्रलेखांवर आता त्यांच्याच 'दिव्य मराठी'तून वाचकांची टीकात्मक पत्रे छापून येत आहेत.
केतकरांची एक खास स्टाइल आहे. त्यांना आपला गोतावळा लागतो. त्याशिवाय ते कामच करू शकत नाहीत. त्यामुळेच त्यांच्याबरोबर समर
आला, प्रशांत पवार, चंद्रकांत, श्रुती, मृण्मयी रानडे,प्रसाद केरकर, विजय
बांदल अशी माणसे आली. केतकरांचा पीए म्हणून 'लोकसत्ता'त आयुष्य काढलेल्या
विकास नाईकला 'दिव्य मराठी'ने पत्रकार बनविले. नाईक हे आता समर खडस गँगमधील
इतर कुणाहीपेक्षा अधिक लिहितात. महाराष्ट्रात 'लोकसत्ता'मधून पीए असलेल्या
दोघांना पत्रकार होण्याचे भाग्य लाभले. एक विकास नाईक आणि त्यांच्यागोदर
माधव गडकरी यांचे पीए राहिलेल्या सुरेंद्र मुळीक यांना खासदार-संपादक संजय
राऊत यांनी 'सामना'त पत्रकार बनविले. अर्थात 'सामना'सारख्या हिंदुत्ववादी
दैनिकातही मुळीकांच्या करिअरचा सुंता करण्याची किमया राऊतांनी साधली!
'दिव्य
मराठी'च्या सर्व आवृत्त्यांची गरज मुंबईतून कदापिही पूर्ण झाली नाही.
मात्र केतकरांच्या मर्जीतील असल्याने काम न करताही समर खडस गँगची 'हवा'
कायम राहिली. आता मात्र प्रशांत दीक्षित रुजू झाल्याने त्यांची हवा चांगलीच
'टाईट' झाली आहे. खरेतर 'सकाळ'मधून 'महानगर'मार्गे 'लोकसत्ता'त आलेले
प्रशांत दीक्षित ही 'दिव्य मराठी'तील स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर
यांच्यानंतरची मोठ्या पदावरील पहिलीच 'सही' नियुक्ती!
स्वत: खांडेकरांकडे प्रचंड प्रतिभा, जबरदस्त व्हीजन आणि कल्पकता-नाविन्याची
ओढ आहे. मात्र, त्यांना महाराष्ट्रात मोठ्या पदावर अजूनपर्यंत एकही चांगला
माणूस मिळाला नव्हता. ते स्वत: मध्यप्रदेशात राहिले-वाढले; हिंदी-इंग्रजीत
पत्रकारिता केली तरीही इथल्या कुणाहीपेक्षा ते उत्तम मराठी जाणतात; उत्तम व
शुद्ध मराठी लिहितात. लोकसत्ता-'मटा'सह महाराष्ट्रातील एकाही राजकीय
वार्ताहर अथवा संपादकाने लिहिला नसेल असा वेगळा मुद्दा मांडणारा,
सडेतोड-आक्रमक असा ''निरंकुश मंत्री महाराष्ट्राने का सोसावा?'' हा
अजित पवार शिवाम्बूप्रकरणातील खांडेकरांचा लेख त्यांच्या बुद्धिमत्तेची
साक्ष देतो शिवाय महाराष्ट्र समजून घेण्याची धडपडही अधोरेखित करतो.
दुर्दैवाने त्यांनी बहुतांश नियुक्त्यांबाबत तडजोड स्वीकारली. अनेक ठिकाणी
चुकीच्या नियुक्त्या झाल्या. अनेक चांगली माणसे 'दिव्य मराठी'मध्ये येऊ
इच्छित असूनही या-ना त्या कारणाने त्यांची समीकरणे जुळली नाही. खांडेकरांनी
आपण नेमलेल्या माणसांवर आंधळा विश्वास ठेवल्यानेही अनेकांवर अन्याय झाला.
मात्र, प्रशांत दीक्षित यांची नियुक्ती हा 'भास्कर'च्या महाराष्ट्रपर्वातील
पहिला बावनकशी निर्णय ठरावा! त्याबद्दल खांडेकरांचे अभिनंदन.
हिंदीतील
एक व्यासंगी पत्रकार अजित वडनेरकर यांच्याजागी प्रशांत दीक्षित समूह
कार्यकारी संपादक म्हणून बहुधा 'दिव्य मराठी'मध्ये रुजू झाले असावेत.
याबाबत अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. त्यां़चे सध्या औरंगाबादेत
खांडेकरांच्या निगराणीत टेÑनिंग सुरू आहे. बहुधा दीक्षित पहिले काही दिवस
औरंगाबाद-नाशिक आणि नंतर मुंबईतच बसतील. युवा सकाळ ही दीक्षितांची ओळख आहे.
त्याहीपलीकडे गुणवत्ता, अचूकता आणि प्रयोगशीलता ही त्यांची बलस्थाने आहेत.
शुद्ध रचना, अचूक व्याकरण याबाबत ते आग्रही आहेत. त्यांना प्रथमत: 'दिव्य
मराठी'तील ढिसाळ वाक्यरचना आणि व्याकरणाच्या भाराभर चुका आवरण्याचेच मुख्य
आव्हान राहील. दीक्षित सकाळ परंपरेतील असल्याने त्यांना योग्य कम्युनिकेशन
आणि वर्किंग सिस्टीम डेव्हलप करायला अडचण येणार नाही. खरेतर 'सकाळ'च्या
कितीतरी अधिकपट योग्य अशा 'भास्कर'च्या सिस्टीम्स आणि मॉड्यूल्स आहेत.
मात्र, चुकीची माणसे बसविली गेल्याने 'दिव्य मराठी'चा गावोगावी
पुढारी/देशोन्नती/संध्यानंद/पु ण्यनगरी झालाय. दीक्षितांना
खांडेकरांना पटवून देत योग्य जागी योग्य माणसे बसवावी लागतील. मात्र,
त्यांनीही केतकरांप्रमाणे 'दिव्य मराठी'ला पत्रकार पुनर्वसन केंद्र करून आपल्याच मर्जीतील कच्च्या-बच्च्यांची सोय केली तर मग 'दिव्य मराठी'चे काही खरे नाही. दीक्षित असे करणार नाहीत, असे वाटतेय.
दीक्षितांच्या
नियुक्तीने 'दिव्य मराठी'तील चांगली माणसे खूष असली तरी समर खडस गँगच्या
पोटात गोळा उठला आहे. कारण प्रशांत दीक्षित यांची मुंबईत 'महाराष्ट्र
टाईम्स'च्या असिस्टंट एडिटरपदी वर्णी लागत होती. सारे काही फायनल होता-होता
समरभाईंनी ते काम होऊ नये म्हणून उठाठेवी केल्या. आता मुंबई ब्युरोमधील
आळसावलेल्या, सुस्तावलेल्या मंडळींना काम दाखवावे लागेल. कारण दीक्षितांनी
बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, असा पवित्रा घेतला तर 'दिव्य मराठी'च्या मुंबई
पुनर्वसन केंद्रातील मंडळींचे काही खरे नाही. आता बघायचेय 'दिव्य मराठी'त
कुणा-कुणाचे श्राद्ध घातले जातेय ते! दिव्य मराठी सुधारणार हे मात्र
नक्की!!
जाता-जाता: आजच्या 'दिव्य मराठी'मधील रसिक पुरवणीच्या जाहिरातीत सत्तेचे नातलग
हा सुरेश भटेवरा यांचाही लेख दिसतोय. 'महाराष्ट्र टाईम्स'चे दिल्ली
प्रतिनिधी असलेले भटेवरा 'दिव्य मराठी'मध्ये लिहिताहेत. ते जर 'दिव्य
मराठी'त रुजू होत असतील तर प्रशांत दीक्षितांप्रमाणेच हाही एक चांगला
निर्णय म्हणावा लागेल. खांडेकरांनी अशीच चांगली-चांगली माणसे आणावीत आणि
'दिव्य मराठी'ला सर्वत्र आलेली मरगळ झटकावी, यासाठी बेरक्याच्या
शुभेच्छा!!
..............................
'दिव्य मराठी'च्या स्टेट एचआर हेड श्रीमती जया आझाद यांना 'भास्कर'च्या मध्यप्रदेश /छत्तीसगड राज्यांचे स्टेट हेड म्हणून प्रमोशन. आझाद यांच्या जागी निशिकांत तायडे 'दिव्य मराठी'चे एचआर स्टेट हेड.
बुधवार 15 मे 2013
जळगावातील छायाचित्रकारांची 'मनसे'कडे लाचारी
8-32 AM
बेरक्या उर्फ नारद
सध्या जळगावातील पत्रकारिता या ना त्या कारणाने चर्चेत आहे. जळगावात पत्रकारांपेक्षा चालती आहे ती छायाचित्रकारांची! 'बेरक्या'कडे आलेल्या एका यादीनुसार, जळगावातील सर्व वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांनी अलीकडेच जळगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची जंगी सभा यशस्वीरित्या,'ललित'पूर्णरीत्या आयोजित करून दाखविणारया तरुण कार्यकर्त्याकडून प्रत्येकी एक हजार रुपयांची 'बक्षिसी' स्वीकारली आहे. पाकिटाचा हा व्यवहार एका आघाडीच्या खासगी बँकेतील नोकरी सोडून राजकीय कार्यकर्त्याकडे नोकरीचा 'योग' स्वीकारणारया विश्वासू माणासामार्फ़त पार पडला. या विश्वासूने दोन मुख्य वृत्तपत्रांच्या पत्रकारांना यापेक्षा २५ पट मोठे पाकिट देउ केले होते. पण 'मनसे'च्या प्रसिद्धीच्या कंत्राटाचे हे काम दोघा पत्रकारांनी नाकारले. आता छायाचित्रकारांना दरमहा एक हजाराचे पाकिट ठरविण्यात आले आहे. त्यामुळे आता 'आरटीओ' पाठोपाठ जळगावात दरमहा पाकिट वितरीत करणारी 'मनसे' ही दुसरी 'पार्टी' तयार झाली आहे.
'आरटीओ'च्या यादीतही बहुतांश वरचीच सर्व माणसे आहेत. फक्त तिथे पत्रकारांची एक स्वतंत्र यादी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नि:पक्ष-निर्भीड आणि भ्रष्टाचारमुक्त पत्रकारितेचा दावा करणारया 'डीएम'मधील माणसे या व इतरत्रही यादीत असणे हा म्हणजे फारच मोठा विनोद आहे. 'डीएम'ची दोघे माणसे या 'आरटीओ'च्या पत्रकारांच्या यादीत आहेत. त्यातील एक मुरुमाच्या; गौण खनिजाच्या बातम्यांना गती देउन मध्येच थांबविणारा व तहसीलदारांकडून पुरेपूर 'वसुली' करणारा आहे. 'डीएम'ची जळगावातील पत्रकारिता 'कलंकित' होत चालली आहे. आव आणायचा, बडेजाव मिरवायचा आणि नंतर 'सेटलमेंट' करायची असा नवा खेळ सुरू झालाय. तहसीलदार कैलास देवरे व महापौर किशोर पाटील या दोघांना विचारले तरी 'डीएम'च्या नि:पक्ष आणि निर्भिडतेच्या चिंधड्या उडतील. उद्योजक रजनीकांत कोठारी यांच्या सुनेने एका निरपराध गरीब माणसाला कारने चिरडले त्या प्रकरणात 'डीएम'ने नंतर शेपूट का घातले? कुणाच्या पदरी काय पडले? दोघा छायाचित्रकारांसोबतच कुणीकुणी 'केके'ची पाकिटे स्वीकारून प्रकरण दडपले? कोठारीच्या नाती, परिवाराची किती छायाचित्रे 'डीएम'ने छापली? जळगावात दुसरे कुणी दिवाळीत रांगोळ्या घालीत नाही का? हा 'व्यवहार' कुणी घडवून आणलाय? त्यानंतर कुणाला कोठारींची फोटोंची ऑर्डर मिळाली. 'डीएम'मध्ये नोकरी सांभाळून बाहेरची 'लाचारी' केलेली चालते का?
राष्ट्रपती प्रतिभाताई यांच्या बांभोरी अभियांत्रिकी कॉलेजात विद्यार्थ्यांचा छळ झाला. त्यात 'डीएम'वाल्यांनी काय सेटलमेंट केली. पहिल्या दिवशी बातमी छापली मग फॉलोअप का नाही? तो का दाबला? 'डीएम'चे क्राईम रिपोर्टर आणि संपादक याचे उत्तर देतील का? संपादक केबिनबाहेर येवून 'डीएम'वाले जे काही घपले करताहेत, लूट करताहेत, खंडणी वसुलताहेत ते पाहणार आहेत की नाही? की काचेच्या चार भिंतीतच त्यांचा कारभार चालणार आहे. औरंगाबादमधील 'डीएम' वरिष्ठही जणू डोळे मिटून आहेत. त्यामुळे जळगावच काय सर्वत्र मांजरी दूध पिऊ लागल्या आहेत. महाराष्ट्राची 'डीएम' कडून फार अपेक्षा आहे; पण सध्या तरी त्यांचेही पाय मातीचेच! अशी स्थिती आहे. तेव्हा गड्या आपला 'लोकमत'च बरा. तो निदान नीतीमत्तेच्या फुकाच्या गप्पा तरी मारत नाही. 'डीएम'ची गोष्ट म्हणजे आव पतिव्रतेचा अन धंदे बाजारबसवीचे असे झालेय. 'बेरक्या'लाच नव्हे तर सर्व महाराष्ट्राला बघायचेच आता कोणते वृत्तपत्र काय कारवाई करते ते. आमचे खुले आव्हान आहे की कुणीही आम्हाला यात तथ्य नाही, हे सिद्ध करून दाखवावे.
जळगावातील महाराष्ट्र टाईम्सच्या हालचालींसह बराच मसाला 'बेरक्या'कडे आहे. तो पुन्हा कधीतरी पाहू.
ता. क. : उद्योगपती रजनीकांत कोठारी यांच्या 'केके' कंपनीतून फक्त 'डीएम'च नव्हे तर वरील यादीतील सर्व छायाचित्रकारांनी पाकिटे स्वीकारली. याच मंडळीने दिवाळीत कोठारींसह जळगाव 'एलसीबी' व 'राष्ट्रवादी'च्या 'मामा'कडूनही वसुली केलीय. जळगावातील पत्रकारांची दिवाळी कोरडी आणि छायाचित्रकार मजेत अशी स्थिती होती. नितीमत्ता खालावलेला, बहिण मानून एका अविवाहित सहकारयाच्या भावी वधूलाच प्रपोज मारणारा एक चळ लागलेला प्रौढ, विवाहित छायाचित्रकार जळगावात आहे . त्याला साथ देतोय तो पत्रकार बनून शिंग फुटलेला एक पूर्वाश्रमीचा छायाचित्रकार … या सर्व नीच, 'काळ्या' कृत्यांवर 'बेरक्या'चा प्रहार लवकरच ….
जाता - जाता : मनसेकडून पाकीटे घेणाऱ्या छायाचित्रकारांची यादी बेरक्याकडे उपलब्ध आहे.ती कधी तरी प्रसिध्द करू...
'आरटीओ'च्या यादीतही बहुतांश वरचीच सर्व माणसे आहेत. फक्त तिथे पत्रकारांची एक स्वतंत्र यादी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नि:पक्ष-निर्भीड आणि भ्रष्टाचारमुक्त पत्रकारितेचा दावा करणारया 'डीएम'मधील माणसे या व इतरत्रही यादीत असणे हा म्हणजे फारच मोठा विनोद आहे. 'डीएम'ची दोघे माणसे या 'आरटीओ'च्या पत्रकारांच्या यादीत आहेत. त्यातील एक मुरुमाच्या; गौण खनिजाच्या बातम्यांना गती देउन मध्येच थांबविणारा व तहसीलदारांकडून पुरेपूर 'वसुली' करणारा आहे. 'डीएम'ची जळगावातील पत्रकारिता 'कलंकित' होत चालली आहे. आव आणायचा, बडेजाव मिरवायचा आणि नंतर 'सेटलमेंट' करायची असा नवा खेळ सुरू झालाय. तहसीलदार कैलास देवरे व महापौर किशोर पाटील या दोघांना विचारले तरी 'डीएम'च्या नि:पक्ष आणि निर्भिडतेच्या चिंधड्या उडतील. उद्योजक रजनीकांत कोठारी यांच्या सुनेने एका निरपराध गरीब माणसाला कारने चिरडले त्या प्रकरणात 'डीएम'ने नंतर शेपूट का घातले? कुणाच्या पदरी काय पडले? दोघा छायाचित्रकारांसोबतच कुणीकुणी 'केके'ची पाकिटे स्वीकारून प्रकरण दडपले? कोठारीच्या नाती, परिवाराची किती छायाचित्रे 'डीएम'ने छापली? जळगावात दुसरे कुणी दिवाळीत रांगोळ्या घालीत नाही का? हा 'व्यवहार' कुणी घडवून आणलाय? त्यानंतर कुणाला कोठारींची फोटोंची ऑर्डर मिळाली. 'डीएम'मध्ये नोकरी सांभाळून बाहेरची 'लाचारी' केलेली चालते का?
राष्ट्रपती प्रतिभाताई यांच्या बांभोरी अभियांत्रिकी कॉलेजात विद्यार्थ्यांचा छळ झाला. त्यात 'डीएम'वाल्यांनी काय सेटलमेंट केली. पहिल्या दिवशी बातमी छापली मग फॉलोअप का नाही? तो का दाबला? 'डीएम'चे क्राईम रिपोर्टर आणि संपादक याचे उत्तर देतील का? संपादक केबिनबाहेर येवून 'डीएम'वाले जे काही घपले करताहेत, लूट करताहेत, खंडणी वसुलताहेत ते पाहणार आहेत की नाही? की काचेच्या चार भिंतीतच त्यांचा कारभार चालणार आहे. औरंगाबादमधील 'डीएम' वरिष्ठही जणू डोळे मिटून आहेत. त्यामुळे जळगावच काय सर्वत्र मांजरी दूध पिऊ लागल्या आहेत. महाराष्ट्राची 'डीएम' कडून फार अपेक्षा आहे; पण सध्या तरी त्यांचेही पाय मातीचेच! अशी स्थिती आहे. तेव्हा गड्या आपला 'लोकमत'च बरा. तो निदान नीतीमत्तेच्या फुकाच्या गप्पा तरी मारत नाही. 'डीएम'ची गोष्ट म्हणजे आव पतिव्रतेचा अन धंदे बाजारबसवीचे असे झालेय. 'बेरक्या'लाच नव्हे तर सर्व महाराष्ट्राला बघायचेच आता कोणते वृत्तपत्र काय कारवाई करते ते. आमचे खुले आव्हान आहे की कुणीही आम्हाला यात तथ्य नाही, हे सिद्ध करून दाखवावे.
जळगावातील महाराष्ट्र टाईम्सच्या हालचालींसह बराच मसाला 'बेरक्या'कडे आहे. तो पुन्हा कधीतरी पाहू.
ता. क. : उद्योगपती रजनीकांत कोठारी यांच्या 'केके' कंपनीतून फक्त 'डीएम'च नव्हे तर वरील यादीतील सर्व छायाचित्रकारांनी पाकिटे स्वीकारली. याच मंडळीने दिवाळीत कोठारींसह जळगाव 'एलसीबी' व 'राष्ट्रवादी'च्या 'मामा'कडूनही वसुली केलीय. जळगावातील पत्रकारांची दिवाळी कोरडी आणि छायाचित्रकार मजेत अशी स्थिती होती. नितीमत्ता खालावलेला, बहिण मानून एका अविवाहित सहकारयाच्या भावी वधूलाच प्रपोज मारणारा एक चळ लागलेला प्रौढ, विवाहित छायाचित्रकार जळगावात आहे . त्याला साथ देतोय तो पत्रकार बनून शिंग फुटलेला एक पूर्वाश्रमीचा छायाचित्रकार … या सर्व नीच, 'काळ्या' कृत्यांवर 'बेरक्या'चा प्रहार लवकरच ….
जाता - जाता : मनसेकडून पाकीटे घेणाऱ्या छायाचित्रकारांची यादी बेरक्याकडे उपलब्ध आहे.ती कधी तरी प्रसिध्द करू...
मंगळवार 14 मे 2013
पुढारीला कार्यकारी संपादक पाहिजे...
7-52 PM
बेरक्या उर्फ नारद
पुणे - नंदकुमार सुतार सकाळमध्ये गेल्याने पुढारीची कार्यकारी संपादक पदाची जागा रिक्त झाली आहे. पद्श्रींनी पुढारी सोडून गेलेल्या काही माजी निवासी आणि कार्यकारी संपादकांना निमंत्रण दिले,पण जुना अनुभव पाहून त्यांनी नकार दिला.त्यामुळे या पदावर कोणाची निवड होणार,याकडे लक्ष वेधले आहे.
मुंबईचे वृत्तसंपादक भालचंद्र पिंपळवाडकर हे सकाळच्या जळगाव आवृत्तीत गेले आहेत.तेथे वृत्तसंपादक पदाची जागा रिक्त आहे.कोल्हापूरात चंद्रशेखर माताडे सकाळमध्ये गेले.पाठोपाठ आता नंदकुमार सुतार सकाळमध्ये गेल्याने सकाळ पुढारीची माणसे फोडण्याचा विडा उचलला की काय,अशी शंका निर्माण होत आहे.
मुंबईचे वृत्तसंपादक भालचंद्र पिंपळवाडकर हे सकाळच्या जळगाव आवृत्तीत गेले आहेत.तेथे वृत्तसंपादक पदाची जागा रिक्त आहे.कोल्हापूरात चंद्रशेखर माताडे सकाळमध्ये गेले.पाठोपाठ आता नंदकुमार सुतार सकाळमध्ये गेल्याने सकाळ पुढारीची माणसे फोडण्याचा विडा उचलला की काय,अशी शंका निर्माण होत आहे.




